पैठणी साडी म्हणजे महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे . पैठणी साड्यांची मोहक रंगसंगती, आकर्षक नक्षीकाम आणि उत्कृष्ट हस्तकलेमुळे तिला "साड्यांची महाराणी" असे संबोधले जाते. महाराष्ट्रातील महिलांच्या आयुष्यात पैठणीला विशेष स्थान आहे. लग्नसमारंभ, धार्मिक उत्सव, मुंज, डोहाळजेवण किंवा इतर शुभकार्यांमध्ये पैठणी साडी नेसणे हा स्त्रियांच्या अतिशय आवडीचे आहे . मात्र ही सुंदर साडी तयार होण्यासाठी अनेक r दिवसांची मेहनत, कुशल कारागिरांचे कौशल्य आणि अत्यंत बारकाईने केलेले काम लागते. पैठणीचा इतिहास महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण या शहरावरून पैठणी साडीचे नाव पडले आहे. प्राचीन काळातीलसातवाहन राजांच्या काळात पैठण हे व्यापार आणि संस्कृतीचे महत्त्वाचे केंद्र होते. त्या काळात येथील रेशमी वस्त्रे आणि हातमागावरील साड्या देश-विदेशात प्रसिद्ध होत्या. काही काळानंतर पैठणीने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आणि ही साडी "पैठणी" म्हणून जगभरात प्रसिद्ध झाली. पूर्वी राजघराण्यातील स्त्रिया आणि श्रीमंत कुटुंबातील महिला पैठणी नेसत असत. ...
एका चांगल्या शहरात , एका सोसायटीत सुमनताई आपल्या मुलगा अनिकेत आणि सून प्राजक्तासोबत राहत होत्या. सुमनताई पारंपरिक विचारांच्या असल्या तरी काळानुसार बदल स्वीकारणाऱ्या होत्या. प्राजक्ता आयटी कंपनीत नोकरी करत होती. सुनेला कामाच्या व्यापामुळे तिला अनेक सण-उत्सवांची माहिती फारशी नव्हती. ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा जवळ आली होती. एक दिवस सकाळी सुमनताई पूजा साहित्याची यादी बनवत होत्या. प्राजक्ताने ते पाहिले. " आई , तुम्ही एवढी तयारी कशासाठी करता आहात ?" तिने विचारले . सुमनताई हसल्या . " अगं , पुढच्या आठवड्यात वटसावित्री पौर्णिमा आहे ना ! त्यासाठी तयारी करते आहे." प्राजक्ता थोडी संकोचून म्हणाली , " आई , मला खरं सांगायचं तर या व्रताबद्दल फारशी माहिती नाही ." " मग छानच . आज तुला सगळं सांगते ," असे म्हणत सुमनताईंनी तिला आपल्या जवळ बसवले . " वटसावित्री व्रत हे महाराष्ट्रातील विवाहित स्त्रिया मोठ्या श्रद्धेने करतात . या व्रतामागे सावित्री आणि सत्यवान यांची कथा आहे ." ...